Breaking

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

तारळी योजेनेचे पाणी अनफळेत पोहचले शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण*


: *तारळी योजेनेचे पाणी अनफळेत पोहचले शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

     तारळी उपासा सिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्याच्या अनफळे या शेवटच्या टोकावर असलेल्या माळी नगर मार्गाने तसेच मायणी परिसरात वाघमोडे तलाव, यलमर वस्ती, मोराळे, गुंडेवाडी या शेवटच्या टोकापर्यत मोठया प्रमाणावर पोहचले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद वाटतो असे उदगार खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी काढले.
         शासनाकडे कोरोनाच्या कालवधीत निधीची कमतरता असल्याने अनफळे गावातील सरपंच पिंटू यलमर, चेअरमन बाळासाहेब कंडरे यांच्या मागर्दशनाखाली आणि खटावचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्या अथक प्रयत्नातून शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच लाख रुपये निधी जमा करण्यात आला होता. तसेच वडूज बाजार समितीचे माजी सभापती सी.एम.पाटील यांच्या मदतीने काही सिमेंट पाईप मिळवून दोन किलो मीटरचे खोदकाम करून हे पाणी अनफळे तलावात आणण्यात आले. तसेच अभिजीत काबुगडे, पांडुरंग पडळकर, महादेव ढवळे, शहाजी काबुगडे, वाघमोडे व अन्य शेतकऱ्यांनी निधी जमा करून हे पाणी वाघमोडे तलावात आणले.
           डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.शिल्पा राजे, तारळी योजनेचे अभियंता श्री.गायकवाड, डेपोटी इंजिनिअर परुळेकर यांच्या सहकार्याने तारळी योजनेच्या पाण्याचे अवर्तण जास्त दिवस वाढवून घेतले. आणि हे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यत पोहचवण्यात यश आले.
          यामुळे अनफळे, मायणी, धोंडेवाडी, गुडेवाडी या परिसरातील शेतकऱ्यामध्ये अतिशय समाधान व्यक्त होत असून शेतकरी वर्गातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ.दिलीपराव येळगावकर आणि योजनेचे सर्व अधिकारी यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानण्यात येत असून तारळीच्या पाण्याचे पूजन अनफळे येथे सरपंच पिंटू येलमर, चेअरमन बाळासाहेब कंडरे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा