*हॉटेल पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, खानावळी, चहाचे गाडे यावर लावलेली बंदी जिल्हा प्रशासनाने शिथील केली आहे. आता हे सर्व व्यवसाय 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हे आदेश दिले.बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानंतर हॉटेल, बार, खानावळी, चहाचे गाडे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या बंदी आदेशाविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत होते. व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांची भेट घेवून त्यांना निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बंदी आदेशात सुधारणा केल्या असून आता निम्म्या क्षमतेने हॉटेल, खानावळी, बार, चहाचे गाडे सुरू ठेवता येणार आहेत. मात्र या ठिकाणी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जावू नये असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा