गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीमय*
गेवराई तालुका प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून आज झालेल्या आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरंपच निवडून आले.
तालुक्यात एकुण 24 पैकी 14 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्या असून ग्रामीण भागात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा