*भारताचे माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिवच्या वतीने अटल वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
संसदपटु भारत रत्न स्व.अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या
जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा धाराशिवच्या वतीने प्रतिष्ठान भवन राजेबाग या ठिकाणी अटल युवा पर्व उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अनेक युवा व युवती स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले वक्तृत्वामधुन विविध विषयाचे सुसंगत मांडणी केली.
या कार्यकामाची सुरुवात स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आली. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषण संबेधित करताना सांगितले की धाराशिव जिल्हयाच्या मातीतुनच प्रमोदजी महाजन यांच्या सारख्या प्रतिभावान नेता व वक्ता जन्मला याच मातीतुन भविष्यातील नेता आज सहभाग घेत असलेल्या स्पर्धकांमधून देखील तयार होवु शकतात.
त्याच बरोबर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विचार मांडले की धाराशिव जिल्ह्यातील युवक व युवतीसाठी त्यांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी नेहमी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन सदैव उपक्रमशिल राहील. या वक्तृत्व स्पधेच्या माध्यमातुन पहिल्या तीन वक्त्यांना पुढील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे या वक्तृत्व स्पर्धेतून भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळा मध्ये प्रखर असे युवा वक्ते ,नेतृत्व या माध्यमातून मिळणार आहे व हि एक नवयुवकांसाठी संधी आहे स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी. अटल वक्तृव्य स्पर्धेचे पारितोषीक वितरण भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटनमंत्री श्री.संजयजी कौडगे, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री.कीरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, प्र.का.स. संताजीराव चालुक्य या मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अटल वक्तृत्व स्पर्धेचे विजेते प्रथम क्रं. श्री बाजीराव काशीनाथ जाधवर यांना रोख रक्कम ३००१/- रुपये प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली, द्वितीय क्रं.कु.अंबिका विजयकुमार आगळे यांना २००१/- रोख रक्कम प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली, तृतीय क्रं. श्री.श्रीराम सुधाकर मुंबरे यांना १००१/- रुपये राख रक्कम प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली, तसेच उत्तेजनार्थ कु.ऋतुजा रावसाहेब मगर व विवेकानंद शिवराम हिप्परगे यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजन सचिन लोंढे यांनी केले. परिक्षक म्हणून प्रशांत गुरव व डॉ.कृष्णा तेरकर हे होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी प्र का स ॲड.खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सरचिटणीस प्रदिप शिंदे, ॲड.नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, इंद्रजित देवकते, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पनगुडे, प्रविण शिरसाठे, पांडुरंग लाटे, डॉ.प्रशांत पवार, पिराजी मंजुळे, राहुल काकडे, दाजीप्पा पवार, शेषेराव उंबरे, विनोद निंबाळकर, संदिप इंगळे, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, सुजित साळुंखे ,अमोल पेठे, हिम्मत भोसले, राज नवले, गणेश देशमुख, रोहित देशमुख, पंकज जाधव, विलास सांजेकर, महिला प्र.का.स. मनिषा केंद्र, देवकन्या गाडे, बालाजी जाधव, स्वप्नील नाईकवाडी, सुशांत सोनवणे,जगदीश जोशी ज्ञानेश्वर सुळ, ओंकार देवकते, आदित्य इंगळे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपला
*राजसिंहा राजेनिंबाळकर *
*जिल्हाध्यक्ष भाजयुमो धाराशिव *


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा