Breaking

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

छत्रपती संभाजीराजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाई नगरीत मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठक संपन्न



छत्रपती संभाजीराजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाई नगरीत मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठक संपन्न 

छत्रपती संभाजीराजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाई नगरीत मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठक तुळजापूर येथे संपन्न झाली.

संविधान हे रयते साठी आहे जर रयते ची गरज असेल तर त्यात बदल होऊ शकतो...
कायदा हा समाजाच्या हिताचा असावा,मराठा समाजाच्या मुलांचे भविष्य सुखर व्हावे यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल,शिक्षण आणि नौकरी साठी हतबल होत आहोत,फक्त शेतकरी म्हणून का जगायचं आणि किती दिवस उपेक्षित राहणार आहोत ? मराठा लोकप्रतिनिधी एकसंघ ताकत दिली तर नक्कीच यावर मार्ग निघेल ? सरकार झोपेतच असते त्यामुळे आरक्षण लढा हा त्यांना जागे करणाराच असला पाहिजे ? दबाव गट सक्षम असला पाहिजे तरच आरक्षण शक्य आहे असल्याचे मत ही यावेळी व्यक्त करण्यात आले.
तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठकित सहभागी होत बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की,न्यायालयाने काढलेल्या त्रुटीची पूर्तता  अन राज्य मागास आयोगाकडून दुरुस्ती करत नूतन अहवाल सादर होणे आवश्यक आहे,तसेच राज्य मागास आयोग सदस्यांना आदेश द्यावेत नवीन दुरुस्ती करावी आणि केंद्र सरकारकडे विनंती मागणी करत घटना दुरुस्ती करून घ्यावी लागेल,मी मराठा आमदार म्हणून तर बरोबर आहोत यात पक्ष महत्वाचा नाही,मराठयांनी हक्काचे आरक्षण मिळायला हव यासाठी कायम आपल्या सोबत असल्याने यावेळी आमदार पाटील म्हणाले.

तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठक आयोजन करण्यात आले होते,यावेळी राज्य समन्वयक सज्जन साळुंके,आमदार राणाजगजीतसिंह पाटील,महेश गवळी, जीवनराजे इंगळे,आबासाहेब कापसे, कुमार टोले,अजय साळुंके,प्रशांत अपराध, प्रतीक रोचकरी, प्रदिवप इंगळे, अॅड धिरज जाधव, गाढे इतिहास तज्ञ विशाल भोसले, सागर साळुंके,अण्णासाहेब क्षीरसागर,ऍड.धीरज पाटील,प्रशांत सोंजी, ऍड.मनीषाताई राखुंडे पाटील,राजसिंह राजेनिंबाळकर, ऍड.दत्तात्रय देवळकर, नगरराध्यक्ष सचिन रोचकरी, गजानन वडणे, बापूसाहेब कणे,गोविंद पारवे,सचिन पाटील,जय निंबाळकर,कैलास बागल, रोहित पडवळ,नंदकुमार गवारे, ऍड.विश्वजित शिंदे,अर्जुन साळुंके, इंद्रजित साळुंके,सुनील रोचकरी,शंतनू गंगणे,शिवाजी बोधले, अमर शेख,सतीश खोपडे, विपीन शिंदे, प्रा.नंदकुमार नंनवरे, बाळासाहेब भोसले यांच्यासह जिल्हाभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

यावेळी अनेक मराठा बांधवांनी आपापले मत व्यक्त करत सरकारच्या आरक्षण विषयीच्या टोलवाटोलवीविरोधी प्रखरपणे निषेध व्यक्त केला, महाराष्ट्रात आज मराठयांना आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी चिंतन करण्याची गरज बनली आहे ? राजकारण असो वा कायदा यावर संभ्रम बनवला जातो आहे ?संविधानात 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही अस वाटत पण यातून मार्ग काढला पाहिजे अभ्यास करावा लागणार आहे, योग्य मार्गदर्शन अन ठोस कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, मराठा समाजाचा फक्त मतदानासाठी फक्त वापर केला जातोय ? राज्यात 50 पेक्षा जास्त मूक मोर्चा काढून देखील सरकारला समाजाच्या वेदना समजत नसतील तर नक्कीच आगामी काळात उद्रेक होईल असा सूर यावेळी या चिंतन बैठकीत व्यक्त करण्यात आला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा